मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काळ्या पैशावर केलेल्या सर्जिकल हल्ल्याचा सकारात्मक परिणाम पहिल्या दोन तीन दिवसातच दिसायला सुरूवात झाली आहे.  राज्यातल्या नगरपालिका आणि महापालिकांमध्ये थकलेला मालमत्ता कर भरून ५०० आणि १००च्या नोटा खपवण्यासाठी एकच गर्दी उसळली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिल्या २ तासात कल्याण डोंबिवली महापालिकेत तब्बल २ कोटी रुपये मालमत्ता कर जमा झाला.  तर उल्हास नगरपालिकेच्या तिजोरीत १ कोटी ३ लाखांची भर पडली. 


इकडे वसई विरारमध्ये ४३ लाखांचा महसूल गोळा झाला. तर धुळ्यात १३ लाख, तर जळगाव महापालिकेतही १६ लाखांचा महसूल गोळा झाला. जालना नगरपालिकेतही करवसुलीचे सगळे रेकॉर्ड मोडले जाण्याची शक्यता आहे. त्यामुऴे केंद्राच्या निर्णयामुळे वर्षानुवर्ष थकललेल्या करांचा भरणा झाल्यान पालिका मालामाल होताना दिसत आहेत.