मुंबई : मनसेच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा परप्रांतियांना मारहाण सुरू केलीय. विक्रोळी पार्कसाईट इथे अमृत नगर भागात मनसेच्या कार्यकर्त्यांनी फेरीवाल्यांना मारहाण केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिकवरून थेट भाजीविक्रीसाठी आलेल्या शेतक-यांना भाजी विकण्यास मनाई करणा-या परप्रांतीय फेरीवाल्यांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी चोप दिला. 


दरम्यान मनसेच्या पदाधिका-यांनी आज पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन घडलेला प्रसंग सांगितला. 


शासनाच्या अध्यादेशानुसार नाशिक मधील मराठी शेतकरी घाटकोपरमध्ये आपला शेतीमाल विकण्यासाठी आला असताना परिसरातील परप्रांतीय फेरिवाल्यांनी त्याला तसे करण्यास मज्जाव केला. 


शेतकरी स्वत: तक्रार घेऊन मनसेकड़े आल्याने त्यात पदाधिकार्याना लक्ष घालवे लागले. 


परप्रांतीय फेरीवाले दादागिरीच्या भाषेत बोलू लागल्याचा मनसे पदाधिकारी आणि शेतकऱ्याचा  आरोप आहे. त्यातून पुढला प्रकार घडला असे मनसे पदाधिकार्यांचे म्हणणे आहे. 


परप्रांतीय फेरिवाल्यांची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही असा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आलाय.


शेतक-यांवर दादागिरी करणा-या परप्रांतियांना असाच धडा शिकवणार असल्याचं मनसे नगरसेवक संदीप देशपांडे यांनी सांगितलंय. 


तर मनसे शेतक-यांच्या ना्वाखाली राजकीय पोळी भाजप असल्याची टीका मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केलीय.