मुंबई :  उरीतल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मनसे आक्रमक झालीय. पाकिस्तानी कलाकारांना मनसेनं धमकी दिलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

48 तासांत पाकिस्तानी कलाकारांनी मायदेशी परत जावे अन्यथा जिथे असाल तिथे घुसून मारु असा इशारा मनसेनं दिलाय.


उरीतल्या दहशतवादी हल्ल्यात भारताचे 18 जवान शहीद झालेत. त्यानंतर देशभरात पाकिस्तानविरोधात संतापाचं वातावरण आहे.


हे कमी की काय म्हणून पाकिस्ताननं संयुक्त राष्ट्रसंघात काश्मीरचा राग आळवला. त्यामुळं पाकिस्तानविरोधात प्रचंड रोष निर्माण झालाय. आता याच पार्श्वभूमीवर मनसेनं पाकिस्तानी कलाकारांना देशात परत जाण्याचा इशारा दिलाय.