मुंबई : जल्लीकट्टूप्रमाणे महाराष्ट्रातही अध्यादेश काढून बैलगाडा शर्यत सुरु करावी अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यासंदर्भात रावसाहेब दानवेंनी मुख्यमंत्र्याशी चर्चा केली. आणि चर्चेनंतर मुख्यमंत्र्यानी निवडणुकीनंतर अध्यादेश काढू असं आश्वासन दिलय. 


वर्षावर आज भाजपच्या नेतृत्वाखाली बैलगाडा मालकांची बैठक झाली. या बैठकीत आचारसंहिता सुरु असल्याने या संदर्भात निर्णय घेणे योग्य होणार नाही पण निवडणूकीनंतर अध्यादेश काढू असा मुख्यमंत्र्यानी आदेश दिल्याची माहिती रावसाहेब दानवे यांनी दिलीय.