मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अखेर युती तोडण्याची अधिकृत घोषणा केली. आगामी महापालिका तसंच जिल्हा परिषद निवडणुकांसाठी भाजपशी युती होणार नाही, असं उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या मेळाव्यात जाहीर केलं. त्यानंतर विविध पक्षातील नेत्यांची त्यावर प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली. नारायण राणे यांनी युती तुटल्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे.


सेना आणि भाजप या दोघांनाही एकत्र लढायचं नव्हतं. दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांना झुलवत ठेवण्याचं काम नेत्यांनी केल्याचा टोला काँग्रेस नेते नारायण राणे यांनी मारला आहे.