मुंबई : राज्यातल्या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये समन्वय नसल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय. पक्षाचे कोकणातले वजनदार नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन मोदी आणि फडणवीस सरकारवर तोफ डागली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या पत्रकार परिषदेत राणेंनी भाजप तसेच संघावर कडाडून टीका केली. जेएनयू वादावरुन देशभरात चाललेला गदारोळ तसेच भाजपच्या मेक इन इंडिया या कार्यक्रमाद्वारे त्यांनी भाजपावर टीकास्त्र सोडले. 


मात्र याच विषयावरुन यापूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेतली होती.