मुंबई : मुंबई महापालिकेत काँग्रेसची सत्ता येणार असल्यामुळेच त्यांनी उमेदवार निवड सुरू केली असा उपरोधक टोला राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहीर यांनी लगावला आहे.


भाजप हा युतीतला मोठा पक्ष आहे. त्यांनीच सेनेकडे युतीचा प्रस्ताव पाठवल्याचं सांगत काँग्रेसनं आघाडीचा प्रस्ताव द्यायला हवा, असं अहीर यांनी सूचित केलं. आता चर्चेची वाट न पाहता दुसरी यादी जाहीर करणार असल्याचंही ते म्हणाले. शिवसेनेच्या 'डिड यू नो' कॅपेनवरही अहीर यांनी टीका केली आहे.