मुंबई :  देवनार गोळीबार प्रकरणी पोलिसांनी ४ जणांना अटक  तर ५ जण फरार आहेत. राष्ट्रवादी पक्षाचे प्रवक्ते आणि माजी आमदार नवाब मलिक यांच्या देवनार येथील मेळाव्यात गोळीबार झाला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अज्ञात व्यक्तींनी आणि राष्ट्रवादीचे माजी खासदार संजय पाटील यांनीच हवेत गोळीबार केल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. त्यानंतर हा आरोप संजय पाटील यांनी फेटाळून लावला. मलिक यांनीच भाडोत्री लोक आणून हल्ला केला, असा आरोप पाटील यांनी केलाय. त्यामुळे राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपामुळे राष्ट्रवादीत भूकंप झालाय.


पाटील आणि मलिक यांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी 4 जणांना अटक केली आहे. त्यामुळे हे प्रकरण अधिक चिघळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद उफाळल्याने पक्ष नेतृत्व काय भूमिका घेतो, याकडे लक्ष लागले आहे.