मुंबई : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही आहे महत्त्वाची बातमी. बारावीचा यंदाचा निकाल उशिरा लागण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या बारावीची परीक्षा सुरु आहे. त्यातच कनिष्ठ महाविद्यालय संघटनेने उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय. १७ मार्चपासून बारावीचा एकही पेपर तपासणार नसल्याचा पवित्रा या संघटनेने घेतलाय. 


पाच हजार शिक्षकांना कामावरून काढण्याच्या नोटीसा दिल्याने संघटनेने हा निर्णय घेतलाय. याप्रकरणी १६ मार्चला विधिमंडळावर संघटनेकडून मोर्चाही काढला जाणार आहे.