मुंबई : १००० आणि ५०० रुपया चे चलन बाद केल्या नंतर बॅंके समोर मोठ्या रांगा लागत होत्या, त्यामुळे काही प्रमाणात नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे , यावर मुंबईत काँग्रेस पक्षातर्फे चाय पे चर्चाच्या धरती वर'नोट पे चर्चा'चे आयोजन करण्यात येत आहे. 


कुर्ला इथल्या अभुदय बॅंकेच्या बाहेर नोट पे चर्चा चे आयोजन करण्यात आले होते ,काँग्रेस च्या नेत्यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर अनेक आरोप करून आम्ही काळ्या पैश्याच्या विरोधात नसून गरिबांबरोबर असल्याने लोकांना कोणताही त्रास होऊ नये या साठी अश्या कार्यक्रमाचे आयोजन केले असे सांगण्यात आले.