मुंबई :  'नीर'ची पाण्याची बाटली मागणाऱ्या प्रवाशांना पॅन्ट्रीकार कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. हजरत निजामुद्दीन-वांद्रे गरीब रथ एक्सप्रेसमध्ये ही घटना घडली. या वरून सर्रास पाण्यासाठी अतिरिक्त पैशांची मागणी करणाऱ्या पॅन्ट्रीकार कर्मचाऱ्यांची दादागिरी वाढल्याचं समोर येतंय.  


प्रवाशांना मारहाण करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. पॅन्ट्रीकार कर्मचाऱ्यांची भरती करताना कोणते निकष लावले जातात आणि ते पाळले जातात का असा प्रश्नही यामुळे उपस्थित झाला आहे.