मुंबई : मुंबई आणि उपनगरात रात्रभर धोधो पाऊस कोसळत आहे. या पावसाचा फटका पश्चिम रेल्वेला बसला आहे. लोकल दहा ते पंधरा मिनिटं उशीरा धावत आहे.


मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, बोरिवली आदी ठिकाणी चांगला पाऊस झाला. मुंबई काही ठिकाणी सखल भागात पाणी साचले. मात्र, याचा वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नाही. तर रस्ते वाहतूक सुरळीत सुरु आहे. सकाळपासून पावसाची रिमझिम सुरुच आहे.