मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे दुष्काळ दौऱ्यासाठी मुंबईहून रवाना झालेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उल्लेखनीय म्हणजे, दोन वर्षांनंतर राज ठाकरे दुष्काळ दौऱ्यासाठी निघालेत. राज ठाकरेंचा हा दुष्काळी दौरा ११ दिवसांचा आयोजित करण्यात आलाय. 


या दौऱ्यादरम्यान त्यांच्यासोबत बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई हेदेखील असणार आहेत. 


दुष्काळ दौऱ्यावर निघताना राज ठाकरे आघाडीसह युती सरकारवर घणाघाती टीका करायला विसरलेले नाहीत.