मुंबई : मुंबई शहरात अवजड वाहनांवर वाहतूक पोलीस विभागानं निर्बंध घातले आहेत. सकाळी सात ते नऊ आणि संध्याकाळी पाच ते रात्री अकरा या वेळेत अवजड वाहनांना मुंबई शहरातल्या वाहतुकीला मनाई करण्यात आली आहे. शहरातली वाहतूक व्यवस्थित चालावी तसंच रहदारीचं सुरळीत व्यवस्थापन व्हावं याकरता वाहतूक पोलिसांनी हे निर्बंध घातले आहेत.