मुंबई : शनिवारी संध्याकाळच्या सुमारास अचानक पालिकेच्या स्कॉर्पिओ कारने पेट घेतल्याची घटना गोवंडी ब्रिजवर घडली. कारला आग लागलेले समजताच आत बसलेले प्रवासी तात्काळ बाहेर आले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी पोहचत कारला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवल मात्र तोवर कार पूर्णपणे जळून खाक झाली होती. 


या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झाली नाही. मात्र या घटनेमुळे गोवंडी ब्रिजवर बरेच काळ वाहतूक कोंडी झाली होती.