(दीपक भातुसे, झी मीडिया), मुंबई : राज्यात मध्यावधी निवडणुका होतील, ही अफवा असल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलंय. मुंबईत पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. यावेळी त्यांनी हे मत व्यक्त केलं. 2019च्या लोकसभेसोबत विधानसभा घेतली जाऊ शकते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खर्च कमी करण्यासाठी लोकसभा-विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याबाबत देशात चर्चा सुरू आहे. त्या अनुषंगानं पवारांनी हे भाकित केलंय. दोन्ही निवडणुका एकत्र झाल्या, तर आपली तयारी असली पाहिजे असं त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांगितलं. शिवसेना दौरे करत आहे, भाजपाही तयारी करतोय. 


मात्र 15 वर्ष सत्तेत असल्यामुळे आपण सुखवस्तू झालो आहोत, अशा शब्दांत पवारांनी कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना कानपिचक्याही दिल्या.