मुंबई : देशात पाच राज्यांच्या निवडणुकीचे निकाल हाती आलेत. अच्छे दिन याचे स्वप्न दाखविणाऱ्या भाजपला जोरदार फटका बसलाय. केवळ एकाच राज्यात निवडणूक जिंकता आलेय. भाजपला तीन राज्यांनी नाकारल्याने शिवसेनेने जोरदार चिमटा काढलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिलेय. जिथे प्रादेशिक पक्ष मजबूत आहेत तिथे जनता त्या पक्षांना पसंती देते हे चांगले लक्षण आहे. त्यामुळे उद्धव यांची प्रतिक्रिया भाजपला बोचणारी आहे.


उद्धव ठाकरे यावर न थांबता भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय. आसाममध्ये भाजप सत्तेवर आले आहे. त्यामुळे आता आसाममधील बांग्लादेशी घुसखोरी थांबेल, अशी अपेक्षा उद्धव यांनी व्यक्त केलेय. त्यामुळे उद्धव यांचा टोला भाजपच्या जिव्हारी लागण्याची शक्यता आहे.