नवी दिल्ली : रियो ऑलिम्पिकसाठी भारताचे 126 ऍथलिट जाणार आहेत. या ऍथलिट्सचा निरोप समारंभ इंडियन ऑलिम्पिक असोसिएशननं आयोजित केला होता. आयओएच्या सदस्यांबरोबर ऑलिम्पिकचे ब्रँड अँम्बेसिडर सलमान खान आणि गायक एआर रेहमान उपस्थित होते. 


टेनिसस्टार सानिया मिर्झा, रेसलर विनेश फोगट, साक्षी मलिक आणि विनोद तोमर उपस्थित होते. त्याचबरोबर जिमनॅस्ट दीपा कर्मारकर आणि टेबलटेनिसपटू मनिका बत्रा उपस्थित होती. 5 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट दरम्यान क्रीडापटूंचा महामेळा ब्राझिलच्या रियो दि जनेरोमध्ये रंगणार आहे. या ऑलिम्पिकमध्ये भारताला ऍथलिट्सकडून मेडल्सच्या मोठ्या अपेक्षा आहेत.