मुंबई : आजपासून मुंबईत इंडियन प्रिमिअर लीग म्हणजेच आयपीएलच्या नवव्या मोसमाला सुरुवात होत आहे. मुंबई इंडियन्स आणि पुणे रायझिंग सुपरजायंट्स या संघांमध्ये पहिला सामना होईल. पण, यंदाचा मोसम कोण जिंकेल याचे अंदाज बांधणं आधीच सुरू झालंय. सट्टेबाजारात बोली लागल्याचे पुढे आलेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुकींवर विश्वास ठेवायचा झाल्यास यंदाच्या मोसमात बंगळुरू रॉयल चॅलेंजर्सना बुकींची सर्वाधिक पसंती आहे. हाच संघ विजेता ठरेल असा त्यांना अंदाज आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर मुंबई इंडियन्स हा संघ पोहोचण्याची शक्यता आहे.


झी मीडिया सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या संपूर्ण मोसमात ६० ते ७० हजार रुपये कोटींचा सट्टा लागू शकतो. प्रत्येक सामन्यात शेकडो कोटी रुपयांची उलाढाल होऊ शकते.


खरं तर टी-२० विश्वचषकात सट्टा लावणाऱ्या व्यक्तींचे अंदाज मोठ्या प्रमाणावर चुकले होते. या चुकांमुळे त्यांना मोठे नुकसान सोसावे लागले होते. आता आयपीएलच्या सट्ट्यातून हे नुकसान कसे भरुन काढता येईल, असा सट्टा लावणाऱ्यांचा प्रयत्न असणार आहे.