विशाखापट्टणम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीत इंग्लंडचा पहिला डाव 255 धावांवर आटोपलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय फिरकीपटूंच्या भेदक माऱ्याच्या जोरावर इंग्लिश संघ पुरता कोसळला. इंग्लंडकडून पहिल्या डावात बेन स्टोक्सने 70 धावा केल्या. तर ज्यो रुट आणि जॉनी बेअरस्ट्रोने प्रत्येकी 53 धावा केल्या. 


पहिल्या कसोटीत भारताची फिरकी गोलंदाजी प्रभावी ठरली नव्हती. मात्र दुसऱ्या कसोटीत चित्र वेगळे दिसतंय. इंग्लंडचा पहिला डाव आटोपल्यानंतर भारताने फॉलोऑन न देता पुन्हा बॅटिंग कऱण्याचा निर्णय घेतलाय. भारताकडून पहिल्या डावात आर. अश्विनने सर्वाधिक पाच गडी बाद केलेत.