मोहाली: ऑस्ट्रेलियाला लोळवून भारतीय संघानं टी 20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे. या विजयानंतर आता यंदाच्या टी 20 वर्ल्ड कपचे सेमी फायनलिस्ट ठरले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वेस्ट इंडिज आणि इंग्लंडनं पहिल्या ग्रुपमधून तर न्यूझीलंड आणि भारत दुसऱ्या ग्रुपमधून सेमी फायनलमध्ये पोहोचला आहे. 


यामुळे आता वेस्ट इंडिज विरुद्ध भारत आणि इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड असा सेमी फायनलचा सामना रंगणार आहे. 


भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये 31 मार्चला म्हणजेच गुरुवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना रंगेल. तर न्यूझीलंड आणि इंग्लंडमध्ये दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानामध्ये 30 मार्चला पहिली सेमी फायनल होईल. 


या दोन्ही मॅचमध्ये जिंकलेल्या टीम 3 एप्रिलला कोलकत्याच्या इडन गार्डनवर फायनल खेळतील.