कानपूर: गुजरात लायन्सनं मुंबई इंडियन्सचा सहा विकेट्सनी पराभव केला आहे.  यामुळे मुंबईचं यंदाच्या आयपीएलमध्ये प्ले ऑफला जायचं स्वप्न संपुष्टात आलं आहे. तर गुजरात लायन्स आणि सनरायजर्स हैदराबाद या दोन्ही टीम प्ले ऑफमध्ये क्वालिफाय झाल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता बंगळुरू, कोलकाता आणि दिल्ली या तीन टीममध्ये प्ले ऑफच्या शेवटच्या दोन स्थानांसाठी चुरस रंगली आहे. 


रविवारी कोलकाता विरुद्ध हैदराबाद आणि बंगळुरू विरुद्ध दिल्ली यांच्यामध्ये होणाऱ्या मॅचनंतरच शेवटच्या चार टीम्स कोण हे उलगडेल. पॉईंट्स टेबलवर नजर टाकली तर हैदराबादकडे 13 मॅचमध्ये 16 पॉईंट्स आणि बंगळुरु, कोलकता आणि दिल्लीकडे 13 मॅचमध्ये 14 पॉ़ईंट्स आहेत.