मुंबई : भारताचा वर्ल्डकपचा प्रवास सुरुवातीपासून फारसा सुखद राहिलेला नाही. भारताला या सीरिजमध्ये पहिल्याच मॅचमध्ये न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागला... आणि आता तर शनिवारी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत दोन हात करायचेत... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्रिकेटप्रेमीही या मॅचसाठी अतिउत्सुक आहेत. मुंबईतल्या काही क्रिकेटप्रेमींनी तर भारतानं ही मॅच जिंकावी यासाठी होम हवनचाही घाट घातलाय. 


मुंबईच्या कांदिवली भागात साईधाम मंदिरात टीम इंडियाच्या विजयासाठी होमहवन करण्यात आलं. भगवान विष्णू आणि काली माँ यांच्योसोबत भारताचा झेंडाही इथं मंत्रोच्चारादरम्यान दिसत होता. 


पाकिस्तानला हरवताना टीम इंडियानं दमदार स्कोअर उभारावा, अशी यावेळी क्रिकेटप्रेमींनी इच्छा व्यक्त केली. 


उल्लेखनीय म्हणजे, टीम इंडियानं आत्तापर्यंत वर्ल्डकपमध्ये एकदाही पाकिस्तानकडून पराभव पत्करलेला नाही. भारतानं हाच रेकॉर्ड कायम ठेवावा, अशी इच्छा क्रिकेटरसिकांनी व्यक्त केलीय.