ऍन्टिग्वा : भारताच्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टेस्टला आजपासून सुरुवात होत आहे. या मॅचसाठी भारतीय संघाची रणनिती तयार झाली आहे. या टेस्टमध्ये आम्ही पाच बॉलर घेऊन खेळू अशी प्रतिक्रिया भारताचा कॅप्टन विराट कोहलीनं दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आम्ही जास्त बॅट्समन घेऊन खेळलो तर 700 रन बनवू शकतो, पण त्यामुळे मदत होणार नाही. टेस्ट मॅच जिंकण्यासाठी 20 विकेट घेणं महत्त्वाचं असतं, असं कोहली म्हणाला आहे. 


सहा बॅट्समन घेऊन खेळल्यामुळे विकेट कीपरबरोबरच बाकीच्या पाच बॅट्समनना जबाबदारी घ्यायला लागेल, असंही कोहली म्हणाला आहे.