कुआनटन : आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारतानं पाकिस्तानला धूळ चारली आहे. अटीतटीच्या झालेल्या या मॅचमध्ये भारताचा 3-2नं विजय झाला आहे. भारताकडून रुपिंदरपाल सिंग, अफान युसूफ आणि निक्कीन थिमाय्हानं गोल करत भारतीयांना दिवाळी भेट दिली.