कोलकाता : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या वनडेत भारताने टॉस जिंकत प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने याआधीचे दोन्ही सामने जिंकत मालिका खिशात घातलीये. त्यामुळे इंग्लंडला वनडे मालिकेतही व्हाईटवॉश देण्याचा मानस घेऊन टीम इंडिया मैदानात उतरेल. 


तर दुसरीकडे भारताच्या भूमीवर एकही विजय मिळवू न शकलेल्या इंग्लंड संघाला पहिल्या विजयाची चव चाखायची आहे.