विशाखापट्टणम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी 405 धावांचे भलेमोठे आव्हान ठेवलेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताने दुसऱ्या डावात सर्वबाद 204 धावा केल्या. यात विराट कोहलीने सर्वाधिक 81 धावा केल्या तर अजिंक्य रहाणे 26 धावांची खेळी केली. तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा पहिला डाव 255 धावांवर आटोपल्यानंतर भारताने दुसऱ्या डावास सुरुवात केली.


तिसऱ्या दिवसअखेर भारताने तीन बाद 98 अशी मजल मारली. विराट कोहली त्यावेळी 56 धावांवर खेळत होता. चौथ्या दिवसाच्या सुरुवातीस भारताला या धावसंख्येत 106 धावांची भर घालता आली.