धरमशाला : भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव पहिल्या दिवशीच संपुष्टात आलाय. ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात ३०० धावांपर्यंत मजल मारता आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताचा स्पिनर कुलदीप यादवने पदार्पणातच जबरदस्त कामगिरी करताना चार विकेट घेतल्या. तर उमेश यादवने २ आणि आर. अश्विन, भुवनेश्वर कुमार आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक विकेट मिळवली. 


ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार स्टीव्हन स्मिथने याने सर्वाधिक १११ धावांची खेळी केली. त्याला चांगली साथ मिळाली ती सलामीवीर डेविड वॉर्नरची. वॉर्नरने ५६ धावा फटकावल्या. तर मॅथ्यू वेडने ५७ धावा केल्या. या तिघांव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाच्या इतर क्रिकेटपटूंनी तितकीशी चांगली कामगिरी करता न आल्याने ऑस्ट्रेलियाचा डाव ३०० धावांवर संपुष्टात आला.