कोलकाता : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरी आणि अखेरची वनडे कोलकाताच्या ईडन गार्डनच्या मैदानावर होणार आहे. मालिकेत भारताने २-० ने विजयी आघाडी घेतलीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामुळे अखेरची वनडे जिंकत इंग्लंडचा व्हाईटवॉश देण्याच्या इराद्याने टीम इंडिया मैदानात उतरेल. त्यामुळे संघात बदल होण्याची शक्यता आहे. सलामीच्या फळीत बदल पाहायला मिळू शकतात. शिखर धवन दुखापतग्रस्त असल्याची बातमी आहे. त्यामुळे तिसऱ्या वनडेत त्याला स्थान मिळणे कठीण आहे. त्याच्या लोकेश राहुलसोबत सलामीला अजिंक्य रहाणेला संधी मिळण्याची शक्यता आहे. धवनने आतापर्यंतच्या दोन सामन्यांत केवळ १२ धावा केल्या.


मधल्या फळीत विराट कोहली आणि धोनीची जागा पक्की आहे. कोहलीने मनीष पांडेला संधी दिल्यास गेल्या सामन्यातील शतकवीर युवराज सिंगला बाहेर बसावे लागेल. मात्र ही शक्यता फार कमी आहे. 


हार्दिक पांड्या आणि केदार जाधव यांची कामगिरी चांगली होतेय. तसेच गोलंदाजही चांगली कामगिरी करतायत. त्यामुळे खालच्या फळीत फारसे बदल होण्याची शक्यता कमी आहे.