मुंबई : २१ जुलैपासून सुरू होणाऱ्या चार सराव सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ आपला रेकॉर्ड सुधारण्याचा प्रयत्न करेल. वेस्टइंडिज विरूद्ध मागील १५ सामन्यांपैकी फक्त ८ सामन्यांत भारताला विजय मिळवता आला आहे. बाकी ७ सामने अनिर्णीत राहीले आहेत.


भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आजपर्यंत एकूण ९० सामने खेळवण्यात आले आहेत. त्यांपैकी १६ विजयी, ३० पराभव, तर ४४ अनिर्णीत राहिले आहेत. नवनियुक्त प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही पहिली मालिका आहे. या दौऱ्यात स्पिनर रविचंद्रन अश्विन भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावेल असे सौरव गांगुली यांचे म्हणणे आहे.