चेन्नई : भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीच्या नावे नव्या विक्रमाची नोंद झालीये. तब्बल 18 सलग कसोटी सामने जिंकणारा विराट कोहली पहिला कर्णधार ठरलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑगस्ट 2015 ते इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीपर्यंत विराटच्या नेतृत्त्वाखाली भारताने एकही सामना हरलेला नाहीये. सलग 18 सामन्यांत भारत अपराजित राहिलाय. 


धोनीने 2014मध्ये तडकाफडकी कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर कोहलीकडे धुरा सोपवण्यात आली होती. त्याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने या वर्षात जबरदस्त कामगिरी केलीये.