हैदराबाद : क्रिकेट फक्त जोरदार फटके मारण्याचा खेळ नाही तर येथे बुद्धीचा देखील तितकाच योग्य वापर केला जातो. येथे त्याच्याच जोरावर मॅच जिंकली जाते.  बांग्लादेश विरुद्धच्या एकमेव टेस्टमध्ये देखील असंत काही घडलं. विराट कोहलीने जर स्वत:चं डोकं नसतं वापरलं तर मग ही मॅच जिंकणं कठीण झालं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दूसऱ्या इंनिगमध्ये बांगलादेशची टीम बँटींग करत होती. अश्विनने इनिंगमधला सहावा ओव्हर टाकला. ओव्हरचा दुसरा बॉल तमीम इकबालच्या पॅडवर लागला. त्यानंतर तो बॉल विराटकडे गेला. सगळ्या खेळाडूंनी एलबीडब्लूची मागणी केली पण विराटने कॅच आऊटची मागणी केली. अंपायरने नॉट आऊट दिलं पण विराटने रिव्यू घेतला. त्यानंतर थर्ड अंपायरने तो आऊट दिला. 


पाहा व्हिडिओ