मुंबई : १ जूनपासून इंग्लंडमध्ये सुरू होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय टीम थोड्याच वेळात इंग्लंडला रवाना होणार आहे. याआधी भारताचा कॅप्टन विराट कोहलीनं मुंबईत पत्रकार परिषद घेतली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा पहिला सामना पाकिस्तानबरोबर ४ जूनला होणार आहे. या सामन्यावर विराटनं भाष्य केलं आहे. क्रिकेट रसिकांसाठी भारत-पाकिस्तान मॅच रोमांचक असते पण आमच्यासाठी इतर मॅचएवढच या मॅचला महत्त्व आहे, असं विराट म्हणाला आहे. या स्पर्धेमध्ये फक्त आघाडीच्या टीम असल्यानं चुरस वाढल्याचंही कोहली म्हणाला आहे.