चेन्नई : करुण नायरचं त्रिशतक आणि केएल राहुलच्या 199 रनच्या खेळीमुळे चेन्नई टेस्टमध्ये भारत मजबूत स्थितीमध्ये पोहोचला आहे. करुण नायरच्या त्रिशतकानंतर भारतानं डाव 759/7 वर घोषीत केला. यामुळे भारताला 282 रनची आघाडी मिळाली. यानंतर बॅटिंगला आलेल्या इंग्लंडनं चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 12/0 एवढी मजल मारली.


इंग्लंडच्या पहिल्या इनिंगच्या 477 रनना भारतानं चोख प्रत्युत्तर दिलं. करुण नायर आणि केएल राहुल बरोबरच पार्थिव पटेलनं 71, आर.अश्विननं 67 आणि रवींद्र जडेजानंही 51 रन केल्या.