कोलकाता : यूसुफ पठान आणि मनिष पांडेच्या चांगल्या खेळीमुळे कोलकाताला डाव सावरता आला. कोलकाताने ५७ रन्सवर ३ विकेट गमावले पण त्यानंतर पठान आणि पांडेने ८७ रन्सची पार्टनरशीप केली. केकेआर २०० रन पर्यंत पोहोचेल असं वाटतं होतं पण शेवटच्या ५ ओव्हरमध्ये सनराइजर्सच्या बॉलरने चांगली बॉलिंग केल्याने केकेआरला फक्त १७१ रन्स करता आले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सनराइजर्सकडून भुवनेश्वर कुमार आणि दीपक हुडडाने २-२ विकेट घेतल्या. सनराइजर्सची प्लेआफची जागा निश्चित झाली आहे. पण केकेआरसाठी ही महत्त्वाची मॅच होती. त्यांना प्लेऑफमध्ये जागा निश्चित करण्यासाठी विजय महत्त्वाचा होता.


कोलकात्याने हा सामना २२ रन्सने जिंकला आणि प्लेऑफमध्ये आपली जागा निश्चित केली.