दुबई : आशिया कपमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अंपायर्सच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करणे विराटला चांगलेच महागात पडलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंपायर्सच्या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त केल्याप्रकरणी विराटला आयसीसीने दंड ठोठावलाय. त्याच्या मानधनाच्या रकमेपैकी तीस टक्के मानधन दंड म्हणून कापले जाणार आहे. 


सामन्यातील १५ षटकादरम्यान कोहली बाद झाल्याच्या अंपायर्सच्या निर्णयावर कोहलीने बॅट दाखवत नाराजी व्यक्त केली होती. तसेच मैदानात सोडताना त्याने अंपायर्सकडे पाहत काही अपशब्द वापरले होते. याप्रकरणी त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आलीये