नवी दिल्ली : टी२० विश्वचषकात पाकिस्तानला भारताकडून पुन्हा पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर पाकिस्तानमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. शाहिद आफ्रिदीवर सर्वच बाजूंनी टीका होतेय. त्यामुळे आता पाकिस्तान क्रिकट असोसिएशन देखील आफ्रिदीकडून कर्णधारपद काढून घेण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा आहेत.


पाकिस्तान संघातूनही आफ्रिदीला बाहेरचा रस्ता देखील दाखवला जाऊ शकते. त्यामुळे या पराभवाचा सर्वात अधिक फटका आफ्रिदीलाच बसणार आहे. आफ्रिदीने केलेल्या वक्तव्यांमुळे ही पीसीबी नाराज आहे. त्यामुळे आफ्रिदीला डच्चू मिळणार हे जवळपास निश्चित आहे.