नवी दिल्ली : आयपीएल मुंबईत खेळवण्यावर एमसीए अजूनही ठाम आहे. यासाठीच मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देत एमसीएनं सुप्रीम कोर्टात धाव घेतलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१ मे २०१६ नंतरचे आयपीएल सामने राज्याबाहेर नेण्याच्या मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात मुंबई क्रिकेट असोसिएशननं सुप्रीम कोर्टात धाव घेतलीय. 


राज्यात असलेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल सामने महाराष्ट्राबाहेर हलवण्याचे आदेश हायकोर्टानं दिले होते. त्याला एमसीएनं याचिकेद्वारे आव्हान दिलंय. याचिकेवर सोमवारी सुनावणी होणार आहे.