मुंबई: मुंबई इंडियन्सचे वानखेडे स्टेडियमवर होणारे सामने जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळवले जातील हे जवळपास निश्चित झालं आहे. मुंबई इंडियन्स संघानंच जयपूर स्टेडियमला पसंती दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रातल्या दुष्काळामुळे हायकोर्टानं राज्यात होणारे सामने बाहेर हलवण्याचे आदेश बीसीसीआय आणि आयपीएलला दिले होते. 


त्यानंतर जयपूर, कानपूर आणि रायपूर हे तीन पर्याय मुंबईपुढे आयपीएलनं ठेवले होते. त्यापैकी मुंबईनं जयपूरची निवड केली आहे. आयपीएलचे चेअरमन राजीव शुक्ला यांनी ही माहिती दिली आहे. 


मुंबईनं जयपूरला पसंती दिल्यानंतर आयपीएलचे अधिकारी राजस्थान क्रिकेट बोर्डाची परवानगी घेणार आहेत. राज्यातली दुसरी आयपीएलची टीम रायजिंग पुणे सुपर जायंट्सनं याआधीच विशाखापट्टणमला आपलं होमग्राऊंड म्हणून पसंती दिली होती.