मुंबई : कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या रोमहर्षक मॅचमध्ये मुंबई इंडियन्सचा चार विकेट आणि एक बॉल राखून विजय झाला आहे. शेवटच्या दोन ओव्हरमध्ये मुंबईनं ३० रन करून विजय मिळवला. अंकित राजपूतच्या १९व्या ओव्हरमध्ये मुंबईनं १९ तर बोल्टच्या २० व्या ओव्हरमध्ये ११ रन करून सामना जिंकला.


मुंबईच्या विजयाचे शिल्पकार ठरले नितीश राणा आणि हार्दिक पांड्या. नितीशनं २९ बॉलमध्ये ५० रन्स केल्या तर हार्दिक पांड्यानं ११ बॉलमध्ये २९ रन्स बनवल्या. याआधी टॉस जिंकून मुंबईनं केकेआरला पहिले बॅटिंग दिली. २० ओव्हरमध्ये केकेआरला १७८ रन्सपर्यंत मजल मारता आली. मनिष पांडेनं ४७ बॉलमध्ये ८१ रन्स बनवल्या. मुंबईकडून कृणाल पांड्यानं सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. तर मलिंगाला दोन आणि मॅकलेनघन आणि बुमराहला प्रत्येकी एक विकेट मिळाली.