मुंबई : रविवारी झालेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याची जबरदस्त चर्चा झाली. कोहलीच्या शानदार फलंदाजीचं विविध स्तरातील मान्यवरांनी कौतुक केलं. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी तरी कसे मागे राहतील? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रविवारी रात्री सामना जिंकल्यावर लगेच ट्वीट करुन मोदींनी कोहलीचं कौतुक केलं. 'काय छान सामना होता. आपल्या संघाचा मी गर्व करतो. विराटची खेळी आणि धोनीचं नेतृत्व खूपच उत्कृष्ट होती.' 



खरं तर रविवारी सकाळी केलेल्या 'मन की बात'मध्येही भारतीय क्रिकेट संघाचं कौतुक केलं होतं. आता देशाच्या पंतप्रधानांनी कोहलीचं केलेलं कौतुक स्पेशलच ठरणार.