बंगळुरू : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारानं भारताचा डाव सावरला आहे. तिसऱ्या दिवसाअखेर भारताचा स्कोअर 213/4 एवढा झाल्यामुळे आता भारताकडे 126 रनची आघाडी आहे. दिवसाच्या शेवटी पुजारा 79 रन्सवर नाबाद आणि अजिंक्य रहाणे 40 रनवर नाबाद आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याआधी ओपनर के.एल.राहुलनंही 51 रन्सची खेळी केली, पण त्याला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. तिसऱ्या दिवसाशी सुरुवात 237/6 अशी केल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव 276 रनवर संपुष्टात आला.


तिसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात भारतीय गोलंदाजांनी झटपट ४ विकेट घेतल ऑस्ट्रेलियाचा डाव संपवला. रविंद्र जडेजाच्या फिरकीसमोर ऑस्ट्रेलियन फलंदाजांचे काही चालले नाही. जडेजाने तब्बल ६ विकेट घेत ऑस्ट्रेलियाची धावसंख्या रोखण्यात यश मिळवले.