मुंबई : भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवशी बेन स्टोक्सची विकेट घेत आर अश्विनने एका नव्या विक्रमाशी बरोबरी केलीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बेन स्टोक्सची विकेट घेत एका डावात त्याने 5 बळी पूर्ण केले. 23वेळा त्याने एका डावात 5 बळी घेण्याची किमया साधलीये. यासोबतच त्याने कपिल देवच्या विक्रमाशी बरोबरी केलीये. 


आर. अश्विनने 43व्या कसोटीत ही किमया साधलीये. तर कपिल देवने 131 कसोटीत 227 डावांत त्याने हा विक्रम केला होता. एका डावात सर्वाधिक वेळा पाच बळी घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत अश्विनआधी हरभजन आणि अनिल कुंबळेचा नंबर लागतो.


हरभजनने 103 कसोटीत 25 वेळा ही कामगिरी केलीये तर कुंबळेने 132 कसोटीत 35 वेळा ही कामगिरी केली.