कानपूर : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ग्रीन पार्कमध्ये 22 सप्टेंबरला होणाऱ्या पहिल्या कसोटीदरम्यान पावसाची शक्यता व्यक्त केली जातेय.आजही टीम इंडिया पावसामुळे सराव करु शकली नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सकाळी टीम इंडिया सरावासाठी मैदानात पोहोचली मात्र पावसामुळे सराव होऊ शकला नाही. शनिवारी सायंकाळी टीम इंडिया कानपूरमध्ये पोहोचली. आज दुपारी एक वाजल्यापासून सराव सुरु होणार होता. मात्र साडेबारा वाजल्यापासून पाऊस सुरु राहिल्याने सराव झाला नाही. 


सोमवारी पाऊस नसल्यास टीम इंडियाचा सराव होऊ शकेल. ग्रीन पार्कमध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्या 22 सप्टेंबर ते 26 सप्टेंबरदरम्यान पहिली कसोटी खेळवण्यात येणार आहे. इंडियन टीम यापूर्वीच कनारपूरमध्ये पोहोचली असून न्यूझीलंडची टीम 19 सप्टेंबरला कानपूरमध्ये पोहोचणार आहे.


याधीही सकाळी जेव्हा टीम इंडिया मैदानावर एक्सरसाइज करत होती तेव्हा एक कुत्रा मैदानात आला. या कुत्र्याला मैदानातून हाकलण्यासाठी ग्राऊंड स्टाफला मोठी मेहनत करावी लागली.