मुंबई: भारत आणि पाकिस्तानमध्ये कोलकत्याच्या इडन गार्डन मैदानावर सामना झाला. या सामन्याआधी दोन्ही देशांची राष्ट्रगीत म्हणण्यात आली. भारताचं राष्ट्रगीत बिग बी अमिताभ बच्चन यांनी म्हंटलं, तर पाकिस्तानी गायक शफकत अमानत अली यांनी पाकिस्तानचं राष्ट्रगीत म्हंटलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण शफकत अमानत अली यांनी राष्ट्रगीत म्हणताना चुका केल्याची चर्चा सोशल नेटवर्किंगवर सुरु झाली आहे. लहान मुलं चांगलं राष्ट्रगीत गायली असती अशी टीका त्यांच्यावर ट्विटरवरून होत आहे. तर अमिताभ बच्चन यांनी चांगलं राष्ट्रगीत गायलच्या प्रतिक्रिया काहींनी दिल्या आहेत. 


या सगळ्या वादावर शफकत अलींनी स्पष्टीकरण दिलं आहे. या वादामुळे आपण नाराज झालो आहोत, राष्ट्रगीत गाताना कोणतीही चूक झाली नाही, पण काही चूक झाली असल्यास माफी मागतो. असं ते म्हणाले.