हैदराबाद : बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत भारताने पाहुण्यांवर पूर्णपणे वर्चस्व गाजवले. या सामन्यात भारताने सहज विजय मिळवला असला तरी बांगलादेशने चांगले प्रयत्न केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सामन्यादरम्यान दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये शाब्दिक चकमकही घडली. अखेरच्या दिवशी भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा आणि शब्बीर रेहमान यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. दुसऱ्या डावातील ६९व्या ओव्हरदरम्यान ही घटना घडली. या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर इशांतच्या फुल लेंथ बॉलला साबिरने ऑफ साईडला डिफेंड केले. 


यानंतर साबिरने काही न बोलता इशांतच्या दिशेने इशारा केला. यावर इशांतने सुरुवातीला शाबिरकडे पाहिले त्यानंतर डोळ्यांनी इशारे करत बॉलवर लक्ष देऊन खेळ आणि तोंड बंद ठेव. यानंतर पुन्हा खेळास सुरुवात झाली.