कोलकता: टी 20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये वेस्ट इंडिजनं भारताचा पराभव केला. या पराभवानंतर धोनीच्या नेतृत्वाविषयी भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंदर सेहवागनं प्रश्न उपस्थित केले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताचा महत्त्वाचा बॉलर आर.अश्विनला दोन ओव्हरच का देण्यात आल्या, या मॅचमध्ये धोनीची कॅप्टनशिप खराब झाली असं सेहवाग म्हणाला होता. 


या मुद्द्यावर आता सौरव गांगुलीनंही भाष्य केलं आहे. मी कॅप्टन असतो तर कोहलीला शेवटची ओव्हर दिली नसती, ज्या ओव्हरमध्ये कोहलीनं विकेट घेतली त्यानंतरची पुढची ओव्हर मी त्याला दिली असती, असं दादा म्हणाला आहे. तसंच भारताच्या दोन सर्वोत्तम बॉलरला शेवटच्या दोन ओव्हर दिल्या असत्या तर चाललं असतं अशी प्रतिक्रिया गांगुलीनं दिली. 


पण धोनीवर टीका करणाऱ्यांनाही दादानं चोख प्रत्युत्तर दिलं आहे. घरामध्ये बसून धोनीच्या नेतृत्वावर टीका करणं सोपं आहे, असं सौरव गांगुली म्हणाला आहे.