नवी दिल्ली : भारत आणि इंग्लंडदरम्यान सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेबाबत भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने भविष्यवाणी केलीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

येत्या 9 नोव्हेंबरपासून भारत आणि इंग्लंड यांच्या कसोटी मालिका सुरु होतेय. या मालिकेत पाच कसोटी सामने होतील. पहिली कसोटी राजकोट येथे होणार आहे. 


भारतीय संघ या मालिकेत 5-0ने निर्भेळ यश मिळवेल अशी आशा सौरव गांगुलीने व्यक्त केलीये. भारतीय संघ सध्या चांगल्या फॉर्मात आहे. त्यांचा हा फॉर्म पाहता आगामी इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत भारत इंग्लंडला 5-0 ने हरवेल अशी आशा आहे, असे सौरव म्हणाला. 


याआधी न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने निर्भेळ यश मिळवले होते.