नवी दिल्ली : भारत क्रिकेट नियामक मंडळ(बीसीसीआय)च्या अध्यक्षपदावरुन अनुराग ठाकूर यांना हटवण्यात आलंय. सुप्रीम कोर्टानं हा दणका दिलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यासोबतच बीसीसीआयच्या सचिवपदावरुन अजय शिर्केंनाही हटवण्यात यावे असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेत. 


लोढा समितीचे नियम न पाळचे परिणाम अनुराग ठाकूर यांना भोगावे लागलेत.  कोर्टात गेल्या दीड वर्षांपासून याबाबतची सुनावणी सुरु आहे. बीसीसीआयच्या कांमांमध्ये पारदर्शकता यावी यासाठी लोढा समितीकडून शिफारशी करण्यात आल्या होत्या.