रांची: श्रीलंकेच्या अनुभव नसलेल्या टीमनं पुण्यातली टी-20 जिंकत भारताला पराभवाचा जोरदार धक्का दिला. यानंतर आता आज होणाऱ्या दुसऱ्या टी-20 मध्ये भारतीय संघ उतरेल तो सीरिज वाचवण्यासाठी. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण याबरोबरच आणखी एक आव्हान भारतासमोर उभं ठाकलं आहे. ते म्हणजे टी-20 रॅकिंगमध्ये नंबर एकवर कायम राहण्याचं. ही मॅच हरली तर धोनी ब्रिगेडचं नंबर वन रॅकिंग धोक्यात येणार आहे.


 


पुण्यातली पहिली टी-20 हरल्यानंतर धोनीनं पीचला दोष दिला होता. हे पीच म्हणजे इंग्लिश खेळपट्टी असल्याचं धोनी म्हणाला होता. त्यामुळे रांचीमध्ये होणाऱ्या या दुसऱ्या टी-20 मध्ये भारतीय संघाला हवी तशी बॅट्समनना अनुकूल खेळपट्टी मिळणार हे निश्चित झालं आहे. 


रांचीमधल्या या मैदानावर भारताचा रेकॉर्ड शानदार आहे. भारतानं या मैदानावर 3 वनडे खेळल्या आहेत, यातल्या तीनही वनडेमध्ये भारताचाच विजय झाला आहे, तर या सगळ्या मॅचमध्ये 300 च्या जवळपास स्कोर झाला आहे, त्यामुळे या मॅचमध्येही रनचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.